विवाह हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र संस्कार आहे जो दोन व्यक्तींना आयुष्यभरासाठी एकत्र बांधतो मात्र,
आजकाल या संस्काराच्या नावाखाली अनेक चुकीच्या प्रथा समाजात बळावत आहेत राजकीय नेत्यांचे नाव घेऊन त्यांचा सत्कार करणे ही त्यापैकी एक प्रथा आहे.
यामुळे वऱ्हाडी मंडळी त्रस्त होतात आणि विवाहाचा खरा उद्देश बाजूला पडतो समाज म्हणून आपण हा बदल घडवू शकतो आणि त्याची सुरुवात वैयक्तिक स्तरावरूनच झाली पाहिजे. माणूस बदलला की समाज आपोआप बदलतोविवाहात सत्कार कोणाचा करावा याचा विचार केला तर समाजातील खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे समोर येतात. लग्न जुळवणारा मध्यस्थ जो दोन कुटुंबांना एकत्र आणतो त्याचा सन्मान व्हायला हवा. पाणी वाढणारा मेहनती कामगार जो सर्वांना सेवा देतो त्याचाही सत्कार होणे गरजेचे आहे .चांगला शेतकरी जो अन्नधान्य पुरवतो आणि चांगला शिक्षक जो समाजाला ज्ञान देतो अशा व्यक्ती समाजाच्या खऱ्या आधारस्तंभ आहेत.या छोट्या बदलांमुळे समाजात सकारात्मकता येईल आणि विवाहासारख्या पवित्र संस्काराला खरा अर्थ प्राप्त होईल प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर चुकीच्या प्रथा हद्दपार होतील आणि समाजात परिवर्तनाची नवी पहाट उगवेल
तुम्हाला काय वाटते? ते नक्की खाली कॉमेंट मध्ये लिहा
लग्नात सत्काराचे वाढते प्रस्थ – प्रतिष्ठेचा प्रश्न की फाजील दिखावा?
पूर्वी लग्न म्हटलं की साधेपणात होणारा एक आनंददायी, कुटुंबकेंद्रित सोहळा. पण आजकालची लग्नं म्हणजे ‘सत्कार महोत्सव’! सत्काराचे शिलेदार अगदी हॉलमध्ये प्रवेश करतानाच हातात फुलांच्या माळा, शाल, श्रीफळ घेऊन उभे असतात. पाहुण्यांचं स्वागत नव्हे तर, “सत्काराचं नाटक” सुरू होतं. अगदी कुणीही आला तरी “मान्यवर” समजून त्याचा एक सत्कार ठरलेलाच. मग खरंच, हे सत्कार नेमके कोणासाठी? आणि कशासाठी?
सत्काराचे बदलते स्वरूप :
सत्काराची संकल्पना पूर्वी ‘कृतज्ञतेचं’ प्रतीक होती. वडीलधारी व्यक्ती, शिक्षक, समाजसेवक, धर्मगुरू, किंवा कुटुंबाचे जेष्ठजाणते – यांचा सन्मान करताना समाज कृतज्ञता व्यक्त करत असे. पण आज, लग्नाच्या मांडवात सत्काराचा उद्देश सन्मान नव्हे, तर “प्रभाव” दाखवणं झालं आहे.
राजकारणी, पंच, सरपंच, संस्थेचे अध्यक्ष, अगदी काहीच न केलेली “ओळखीतली माणसं” – यांचा सन्मान फक्त त्यांच्या ‘हजेरी’मुळे होतो. फोटोंमध्ये दिसणं, समाजात “ते आमच्या लग्नाला आले होते” असं सांगणं, हेच आता खरे उद्दिष्ट दिसते.
राजकारण्यांचे सामाजिक योगदान – की केवळ उपस्थिती?
लग्नात वावरणारे राजकारणी बऱ्याचदा गावाच्या किंवा कुटुंबाच्या हितासाठी काही ठोस कार्य केलेले नसतात. पण त्यांची उपस्थिती म्हणजे ‘सोशल स्टेटस’. त्यामुळे त्यांना केवळ चेहऱ्यामुळे सत्कार मिळतो. मग त्यांच्या योगदानाचं काय? जर का त्यांनी गावात पाणी आणलं असेल, शाळा बांधली असेल, युवकांना रोजगार दिला असेल – तर नक्कीच त्यांचा सन्मान करायला हवा. पण “सत्कार” केवळ ओळखीच्या किंवा पक्षीय नात्यामुळे केला जातो, हे दुर्दैव.
सत्कार करावा तरी कोणाचा?
सत्कार करावा, पण त्यामागे काही मूल्य, काही कामगिरी, काही प्रेरणा असायला हवी.
- शिक्षक, ज्यांनी अनेक पिढ्यांना घडवलं आहे.
- शेतकरी, जो संपूर्ण समाजाचा पोशिंदा आहे.
- सामाजिक कार्यकर्ता, जो गावात रस्ते, स्वच्छता, आरोग्य यासाठी झटतो.
- कोणतेही विशिष्ट कार्य करणारी सामान्य माणसं, ज्यांचं योगदान गाजत नाही, पण समाज घडवतो.
सत्काराचे अतिरेकाचे दुष्परिणाम :
- खर्चात भर – माळा, शाल, श्रीफळ, फोटो फ्रेम यावर हजारोंचा खर्च होतो.
- वेळेचा अपव्यय – ५० लोकांचा सत्कार म्हणजे तासाभराचं ‘प्रोग्रामिंग’.
- मुख्य हेतू विसरला जातो – लग्न म्हणजे दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा मिलाप. पण तो झाकून ठेवला जातो.
- लहान-मोठ्यांमध्ये असमानता – ज्यांचा सत्कार झाला नाही, त्यांना उपेक्षा वाटते.
समारंभात थोडंसं बदललं पाहिजे :
- सत्कार नको असे नाही, पण विचारपूर्वक, योग्यानं आणि गरजेपुरताच.
- सामाजिक योगदान असलेल्या व्यक्तींनाच गौरव.
- “सत्कार करतो आहोत की फोटो काढतो आहोत?” याचा विचार.
- नातेसंबंध, सुसंवाद, आणि आनंदाचा मूळ हेतू विसरू नये.
उपसंहार :
सत्काराचं मोठेपण सन्मानित व्यक्तीच्या कृतीतून दिसलं पाहिजे, केवळ स्टेजवर उभं करून हार घालून नाही. आपण जर खऱ्या अर्थाने समाजासाठी काही करणाऱ्या लोकांना समोर आणून त्यांचा सन्मान केला, तर लग्नाचा मंच एक प्रेरणास्थान बनेल. नाहीतर सत्काराचा हाच बाजार पाहून उद्या वधू-वरच विचारतील – “आपला सत्कार कोण करणार?”
@ लग्न अक्षदा टीम
शोभेच्या नावाखाली धर्मविधींची सर्रास थट्टा Read more…

या मुलींना लग्नासाठी योग्य स्थळेच मिळेना! Read more…

मराठा लग्न अक्षदा विवाह विषयक group साठी click करा
Leave a Reply